राष्ट्रीय फळबाग मोहीम
राष्ट्रीय फळबाग मोहीम ही केंद्राने प्रायोजित केलेली योजना असून भारत सरकारने ती 10 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे 2005-06 मध्ये सुरू केली. भारतामधील फळबाग-क्षेत्रांचा सर्वंकष (होलिस्टिक) विकास करणे आणि ह्या क्षेत्रामधून होणारे उत्पादन वाढवणे हा ह्या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
ईशान्ये कडील आठ राज्ये (सिक्किम सहित) तसेच जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड वगळता इतर सर्व राज्ये व केंद्र शासित प्रदेशांचा ह्या अभियानात समावेश आहे. वर उल्लेखिलेल्या राज्यांमध्ये टेक्नॉलॉजी मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर इन द नॉर्थ-ईस्टर्न स्टेट्स (टीएमएनई) हे एक वेगळे अभियान सुरू आहे.अकराव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान 85% मदत केंद्राकडून मिळेल तर 15% रक्कम राज्य सरकारे भरतील.
ह्या योजनेच्या अधिक तपशिलांसाठी ह्या वेबसाइटला भेट द्या -
राष्ट्रीय फळबाग मोहीमेची वेबसाइट

